Akshata Chhatre
कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी त्यात प्रेम, विश्वास, आदर आणि संवाद असणे आवश्यक आहे.
सतत होणारी चिडचिड किंवा संताप हे नात्यातील दुराव्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. चला जाणून घेऊया राग नियंत्रित करण्यासाठी काही सोपे उपाय.
जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा लगेचच काहीही बोलू नका. बोलण्याआधी १० आकडे मोजा आणि शांतपणे विचार करा.
आयुष्यात ताणतणाव कमी करण्यासाठी स्वतःवर हसण्याची सवय लावा. तुमच्या काही मूर्ख कृती किंवा अपेक्षांवर हसून त्यांना हलक्याफुलक्या पद्धतीने घ्या.
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःबद्दल जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा राग, प्रेम, दया किंवा मत्सर या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन बाहेर पडते, जे ताणतणाव आणि राग कमी करण्यास मदत करते.